सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Wardha लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

माजी सैनिक, सैनिकांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

  माजी सैनिक, सैनिकांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 27 : इसिएचएस पॉलिक्लिनिक आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 150 माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी लाभ घेतला.  जुनी जिल्हा परिषद ईमारत येथील इसीएचएस पॉलिक्लिनिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आरोग्य तपासण्या करुन घेतल्या. त्यासोबतच आवश्यक असलेल्या आजाराबाबत एक्स-रे व रक्त तपासणी करुन घेतली. शिबिरास पुलगाव सीएडी कॅम्पचे कर्नल गोपी आनंद एन, प्रशासकिय अधिकारी तथा कर्नल एम. राउतेला, इसीएचएसचे अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  शिबिराच्या यशस्वीतेसाठी इसीएचएस पॉलिक्लिनीकचे डॉ.एस.एस. रावलानी, डॉ.एस.के.थत्ते, सुभेदार मेजर निशिकांत होरे व कर्मचा-यांचे योगदान लाभले.

आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग

 आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग 🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 29 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत पंचायत समिती, आर्वी अंतर्गत सर्व 73 ग्रामपंचायतींचा अमृत कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत मिर्झापूर (नेरी) येथून कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत 73 ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले होते. यात्रा स्मार्ट ग्राम मिर्झापूर ते पंचायत समिती आर्वी येथे आल्यानंतर आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांनी कलश यात्रेचे स्वागत केले. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी माती कलश आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार श्री. केचे यांनी आपल्या सोबत आणलेले तांदुळ पंचायत समिती आर्वीच्या कलशामध्ये जमा करून सहभाग नोंदवला व त्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले....

04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन

*सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पीकविमा व 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी पार्टी समुद्रपूर पार्टी समुद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसीलदार, साहेब समुद्रपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*  04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन.  🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी दिले निवेदन     परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोयाबीनच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची वाढ झाली नव्हती. त्यातच काही जणांचे कसेबसे आलेले सोयाबीनची काढणी सुरू ह्यायचा अगोदरच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सततच्या पावसानं त्यांच्या श...

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी - रामदास आठवले

 दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी - रामदास आठवले Ø दिव्यांगांना साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ Ø वर्धा तालुक्यातील 826 दिव्यांगांना साहित्याचे वाटप Ø प्रत्येक तालुक्यात होणार साहित्य वाटपाचा कार्यक्रम वर्धा, दि. 23 (जिमाका) : दिव्यांग व्यक्ती शरीराने अपंग असला तरी बुद्धीने मात्र तो हुशार असतो. या व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची चांगली अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.  चरखा सभागृह येथे जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्यावतीने अलिम्को कंपनी मार्फत दिव्यांगांना साहित्य वितरणाच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी श्री.आठवले बोलत होते. कार्यक्रमाला खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सेवाग्रामच्या सरपंच सुनिता ताकसांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, जिल्हा परि...

वर्धा जिल्ह्याकरीता हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

 वर्धा जिल्ह्याकरीता हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा, दि. 13 : भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी दि.14 व 16 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट असल्याचे दर्शविले असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच दि.15 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  सद्या मान्सून कालावधीत जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस झालेला असून बहुतांशी प्रकल्प भरले आहेत. मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील वर्धा, वना, बोर, पोथरा, यशोदा ईत्यादी नद्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच सदर कालावधीत पोळा व तान्हा पोळा असून हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.  वीजगर्जना होत असतांना शक्यतो घराच्या ब...

राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा

 राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा  7 कोटी 73 लक्ष 51 हजार रुपये तडजोड मूल्य  🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा, दि 13 :वर्धा जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2 हजार 172 प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य 7 कोटी 73 लक्ष 51 हजार 268 इतके आहे. न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदालतीचा मुख्य उद्देश आहे.  राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोकअदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा शजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.एन.करमरकर यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले.  राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणात प्...

जिल्हाधिकारी यांनी घेतली सर्पदंशाच्या निवेदनाची दखल !

 सर्पदंशाच्या उपचारा संदर्भात तज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा येत्या पंधरवाड्यात घेणार 🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयात सर्पदंशाच्या उपचारा संदर्भात योग्य व अचूक उपचार करण्या बाबत तज्ञा डॉक्टरांच्या कार्यशाळेचे येत्या पंधरवाड्यात आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे.     यासंदर्भात दि 12 सप्टेंबरला जीवरक्षक फाऊंडेशन व रुग्णमित्र फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सर्परुग्णावर योग्य उपचार होत नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त केली.या निवेदनाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी त्वरित कॉल करून जिल्हा शल्य चिकित्सकांना बोलाविले.व या गंभीर प्रश्नावर तज्ञ डॉक्तरांची कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार येत्या पंधरवाड्यात ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी या गंभीर विषयाला वाचा फोडणारे वन्य जीवरक्षक राकेश झाडे व रुग्णमित्र गजू कुबडे यांना यावेळी दिले.        याशिवाय शहरातील मोकाट जनावर...

Nagpur Police nabs 3 accused in case of dacoity of 4.40 crores within 5 hours

 Nagpur Police nabs 3 accused in case of dacoity of 4.40 crores within 5 hours  Crime Branch (Detection), Nagpur City, nabbed the accused in a case of dacoity of 4.40 crores under the jurisdiction of Police Station Vadner District Wardha.  As soon as the Deputy Commissioner of Police, Crime Branch (Detection), Nagpur city received the information that 4.40 crores of dacoity has taken place in Wardha area and the accused are coming towards Nagpur after committing robbery ,Deputy Commissioner of Police Crime Branch (Detection) himself as well as Night Round Officer Police Deputy Commissioner Zone 02 along with Crime Branch Unit no. 01 ,Unit 3 and Unit 4 formed different teams to search for the suspected vehicle and the accused. Police was successful in nabbing all the three accused. No 1) Brijpal Singh Thakur. Vehicle No  MH-31 EQ 0909 used in the crime was seized from him.Accused no 2) Nane Aleem Shaikh resident of Gittikhadan Nagpur. Accused no 3) Dinesh Wasnik...

अधिस्विकृती समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल प्रफुल्ल व्यास यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार

 अधिस्विकृती समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल प्रफुल्ल व्यास यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार वर्धा, दि.6 (जिमाका) : राज्य शासनाने नुकत्याच राज्य व विभागीय अधिस्विकृती समित्या जाहीर केल्या आहे. नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीवर सदस्य म्हणून दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते श्री.व्यास यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जेष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, प्रविण धोपटे, अजीज शेख, शशांक चतारे, प्रशांत अग्रवाल, सुनील गावंडे, संजय देसाई, अविनाश नागदेवे यांच्यासह विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी दिलीप बोंडसे, पंढरीनाथ लुटे, संजय चिटटवार आदी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री.व्यास यांचा नियुक्तीबद्दल सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्य व विभागीय अधिस्विकृती समिती, समितीचे क...

मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभादायक -आशुतोष करमरकर

  मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभादायक  -आशुतोष करमरकर वर्धा, दि.5 (जिमाका) : मध्यस्थी ही वाद निवारणाची परिणामकारक पध्दत आहे. न्यायवितरणासह वादनिवारण हेही न्यायालयाचे कर्तव्य असते. मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभकारक असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हाज व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमरकर यांनी मध्यस्थी जनजागृती शिबिरात केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने विधी सेवा सदर येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधिश -1 एन.बी शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधिश-4 जे.ए.पेडगावकर, कामगार न्यायाधिश एस.ए.देशपांडे, अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ए.एन. ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी. देशमुख आदी उपस्थित होते. पंचायतीच्या स्वरुपात मध्यस्थी प्रक्रिया पूर्वीपासून अस्तित्वात होती. न्यायाधीशांवर न्यायपूर्ण व तटस्थ अवलोकन करुन अशा शक्यतांचा शोध घेतला पाहिजे. त्या तपासून विवरणाचा सुवर्णमध्य गाठता येतो. दोन्ही पक्षांचे सम...

उत्सव साजरा करणा-या मंडळांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 उत्सव साजरा करणा-या मंडळांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन वर्धा, दि.5 (जिमाका) : यावर्षी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, शारदोत्सव इत्यादी सार्वजनिक कार्यक्रमाकरिता वर्गणी जमा करुन तात्पुरत्या स्वरुपात उत्सव साजरा करण्याकरिता मंडळाकडून ऑनलाईन परवानगी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तसेच परवानगी ऑनलाईन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ (क) नुसार सन २०२३ नुसार उत्सव साजरा करणा-या मंडळांना परवाणगी घेणे आवश्यक आहे. यासाठी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा, ऑनलाईन अर्ज सादर करतांना मंडळांनी मंडळाचा ठराव ज्यामध्ये मंडळाचे नाव ठरविणे, मंडळाचे कार्यकारी मंडळ निवडणे, ज्या ठिकाणी मुर्तीची स्थापना, उत्सव साजरा करावयाचा आहे ते ठिकाण ठरविणे इत्यादी बाबींचा उल्लेख असावा. मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास मागील वर्षांचा हिशोब, मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास परवानगी पत्र. ज्या जागेवर मुर्तीची स्थापना, उत्सव साजरा करावयाचा आहे, त्या जागेच्या मालकाचे मुर्तीस्थापनेसा...