सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आदिवासींचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवायचा आहे - केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप


आदिवासींचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवायचा आहे 
-केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी 
एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप

नागपूर : देशातील सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करण्याची, विशेषत्वाने आदिवासी, मागास लोकांच्या जीवनात परिवर्तन होऊन ते चांगले जीवन कसे जगतील, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था त्याच प्रयत्नांवर २७ वर्षे कार्य करीत आहे. शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणे आणि त्यांच्या जीवनाचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ (सुखांक) वाढविण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.

   




कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी इंडिया टिव्हीचे एडिटर-इन-चीफ तसेच चेअरमन श्री. रजत शर्मा, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पिठाचे पीठाधीश्वर श्री. जितेंद्रनाथ महाराज, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुण लखानी, उपाध्यक्ष श्री. केशव मानकर, सचिव श्री. राजीव हडप, सहसचिव श्री. विरेंद्र अंजनकर, कोषाध्यक्ष श्री. अतुल मोहरीर, श्री. अतुल शिरोडकर, श्री. धनंजय बापट, श्री. डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. राजीव पोतदार, श्री. रुपेश ढेपे, श्री. वसंत चुटे, श्री. अनील जोशी, श्री. प्रशांत बोपर्डीकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘कै. लक्ष्मणराव मानकर संस्थेने २७ वर्षे पूर्ण केली आहेत. एखादी संस्था २७ वर्षे सातत्याने काम करते हे फार दुर्मिळ आहे. कै. मानकर गुरुजी आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. संसदीय कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संघटनेसाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. विदर्भातील मागास भागातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते. मानकर ट्रस्टच्या स्मृती त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जुळलेली आहे.’ यावेळी ना. श्री. गडकरी यांनी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतील पदाधिकारी व सदस्यांचा परिचय करून दिला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या संस्कारातून संस्थेतील सर्व लोक समाजासाठी निःस्वार्थ कार्य करीत आहेत. ‘वही मनुष्य है की जो मनुष्य के लिए मरे’ या ओळींचा परिचय देणारे कार्य सुरू आहे,’ असेही ते म्हणाले. श्री. जितेंद्रनाथ महाराज यांनी ना. श्री. गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला. एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक-पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तर अनुपमा देशपांडे, रविंद्र फडणवीस, चंदू पेंडके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिवाळीमध्ये १२०० पुरुष शिक्षक आणि पर्यवेक्षकांना शर्ट-पँट तसेच महिलांना साडी पाठविणार असल्याची घोषणा ना. श्री. गडकरी यांनी केली. २४ ते २७ अॉगस्ट या कालावधीत झालेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये आदिवासी क्षेत्रातील १ हजार १६ एकल विद्यालयांचे शिक्षक व पर्यवेक्षक सहभागी झाले होते.


लाखो आदिवासींना रोजगाराचे स्वप्न

आदिवासींपर्यंत संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना पोहोचविल्या. जन-धन योजना, अटल पेंशन योजना, उज्ज्वला गॅस योजना, जीवन ज्योती विमा योजना आदींचा लाभ मिळाला. पण याने काम होणार नाही. याच्याही पुढे जायचे आहे. रोजगाराच्या दिशेने पाऊल टाकायचे आहे. आदिवासी भागातील लाखो लोकांना रोजगार प्राप्त करून द्यायचा आहे, असा निर्धार ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.  



झिंग्यांच्या शेतीतून रोजगार

झिंग्यांचे भाव सिंगापूरमध्ये ८ हजार रुपये किलो आहे. आपल्याकडे २०० रुपये प्रतीकिलो आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये ६ हजार मालगुजारी तलाव आहेत. याठिकाणी आपण झिंग्यांची शेती करू शकता. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आम्ही शिकवू, तुम्ही फक्त रोजगार निर्माण करा, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी आदिवासी युवकांना केले.  


एकल विद्यालयाचे काम प्रेरणादायी : रजत शर्मा

मला याठिकाणी एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पण खरे तर माझ्याकडून तुम्हाला काही प्रेरणा मिळावी, यापेक्षा तुमच्याकडून मला प्रेरणा मिळत आहे, या शब्दांत श्री. रजत शर्मा यांनी गौरव केला. गरिबांना, उपेक्षितांना शिक्षण देणे, यापेक्षा मोठे काम नाही, असेही ते म्हणाले. ना. श्री. गडकरी यांच्याबद्दल ते म्हणाले, ‘कल्पकतेच्या क्षेत्रात नितीनजींचे योगदान अमर्याद आहे. कल्पना असतील, कल्पक प्रयोग असू शकतात, पण त्यांची अंमलबजावणी नितीनजीच करू शकतात. कमालीचा आत्मविश्वास आणि समर्पण त्यांच्यामध्ये बघायला मिळतं. मी नितीनजींना चार दशकांपासून ओळखतो. तरीही प्रत्येकवेळी त्यांची नवी ओळख होते. त्यांच्यासारख्या लोकांमुळे समाजाला दिशा मिळण्याचे काम होते.’


…आणि मी टिव्हीवर आलो

श्री. रजत शर्मा यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘माझे आयुष्य सुरुवातीला साधारणच होते. दिल्लीमध्ये भाजी बाजारात एक दहा बाय दहाची खोली होती. बालपण तिथेच गेले. घरी वीज नव्हती. शेजारी असलेल्या रेल्वे स्टेशनवर अभ्यास करायचो. त्याकाळात टिव्हीवर शनिवारी अर्धा आणि रविवारी अर्धा सिनेमा दाखवायचे. मी दुसऱ्याच्या घरी जाऊन बघायचो. एकदा चित्रपट बघायला मिळाला नाही म्हणून अस्वस्थ होतो. तर वडील म्हणाले, ‘दुसऱ्याला बघायला टिव्हीवर जातो, पण दम असेल तर स्वतः टिव्हीवर ये, लोक तुला बघतील.’ मला आनंद आहे की माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो.’

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...