सीधे मुख्य सामग्री पर जाएं

राज्यात दलित सुरक्षित नाहीत; हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' - डॉ. नितीन राऊत


*श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना मारहाण, डॉ. राऊतांची राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका*

नागपूर, दिनांक - २८/०८/२०२३ :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? राज्य सरकारला राज्यात वर्णव्यवस्था आणायची आहे? पण काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही. या देशातील दलित, वंचित यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष, धर्मांध राज्य शासनाच्या विरोधात लढत राहील.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हा जातीभेद संपणार कधी? असा प्रश्न करीत राज्याचे माजी मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका केली.

मोलमजुरी करुन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या शालेय दलित विद्यार्थ्यांना चोरीच्या संशायावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. हे तरूण आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात.

सध्या नुकताच सोशल मीडियावर एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील वर्गमित्रांकडून कानाखाली वाजवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिकाच मुस्लिम विद्यार्थ्याला आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असताना आता चार दलित तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पार्टी द्वारे सातत्याने करण्यांत येणारे घृणित राजकारणाचा परिणाम आहे. घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे देशात जातीय अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे, असे ही यावेळी डॉ. राऊत म्हणालेत.

संबंधित घटनेतील पीडित तरुण शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड व प्रणय खंडागळे यांना जबर मारहाण करण्यात आली. यातील काही अल्पवयीन व दलित समाजातील आहेत. याप्रकरणी दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळ्याव्या व तात्काळ अटक करून या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन कठोर कारवाई करावी तसेच पिढीतांना संरक्षण द्यावे, त्यांच्या शिक्षणाच्या खर्च शासनाने वहन करावा व पिढीतांना शासकीय नोकरी मिळून देण्याची हमी द्यावी. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हे कृत्य मानवतेवरील कलंक आहे. याप्रकरणी दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी. या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासीयांच्या भावना अत्यंत तीव्र असून डॉ. नितीन राऊत यांनी या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध नोंदविला. सरकारने याकडे गांभीर्याने पाहावं. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी पत्रा द्वारे डॉ. राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना केली आहे.




इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...