सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सैनिकांसाठी प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी अर्पण सोहळा संपन्न

 सैनिकांसाठी प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी अर्पण सोहळा संपन्न


सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी तयार करून सैन्यांना पाठविणे हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षापासून घेतला जातो. सैनिक हा देशाचा कणा आहे. ज्या देशाची सैनिक मिलिटरी व्यवस्था समृद्ध असते तो देश अग्रेसर असतो हाच उद्देश समोर ठेवून प्रहाराने मिलिटरी शिक्षणात पुढाकार घेतला आहे. सैनिक सीमेवर रात्रंदिवस कठीण परिस्थितीचा सामना करतो त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते करणे व सर्व भारतीय बांधवांच्या प्रेमाचा दिलासा देणे या उद्देशाने प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये राखी अर्पण समारंभ घेण्यात येतो. यावर्षी 19 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रहारच्या शिस्तबद्ध बँड पथकाने प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. भारत मातेचे पूजन व प्रमुख अतिथींच्या सत्कारानंतर कार्यक्रम पार पडला. लष्करी शिस्तीत अमर जवान ला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण करून सैनिक सीमेवरील कष्ट संकटे किती हिमतीने, एकजुटीने व अभिमानाने झेलतात. हे प्रहार च्या विद्यार्थ्यांनी एका देशभक्तीपर गायना द्वारे प्रस्तुत करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.

याप्रसंगी सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या आणि इतरही विविध शाळांनी तयार केलेल्या राख्या मेजर जनरल ए.एस.देव अध्यक्ष अनिल महाजन सचिव यांनी लेफ्टनंट कर्नल एस मणिकंदन ए.पी.एस कामठी, यांच्या स्वाधीन केल्या जेणेकरून रक्षाबंधन पर्यंत त्या राख्या सीमेवरील सैन्यात पोहोचतील व त्यांच्या खडतर कार्याविषयी अभिमान कृतज्ञता व सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचेल. प्रहारच्या राखी अर्पण कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रहारच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. प्रहारची शिस्त, कार्यक्रमाचे व्यवस्थापन कौशल्य, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशप्रेम जबाबदारीची जाणीव यांनी ते प्रभावित झाले. शाळेच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी उपस्थित होते. सी.पीअँड बेरार च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्रमुख, प्राचार्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रहारच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेच्या शिक्षिका मंजुषा वैरागडे यांनी मानले. कार्यक्रमात नागपुरातील सगळ्या शाळांनी एकूण सोळा हजार राख्या पाठवून सक्रिय सहभाग घेतला व नागपुरातील 22 विविध शाळांनी राखी अर्पण कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली होती.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...