सीधे मुख्य सामग्री पर जाएं

उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी

 उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : चर्मकार सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार

नागपूर - उत्तम शिक्षण हा विकासाचा पाया आहे. चर्मकार समाजाला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. गुणवंतांच्या सत्कारातून त्याची प्रेरणा नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले. 

चर्मकार सेवा संघाच्या वतीने गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुणवंतांचा सत्कार सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, संस्थेचे प्रमुख भैय्यासाहेब बिघाणे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला श्री संत रविदास यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘ गरिबांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करून त्यांना उजेडाचा मार्ग सापडावा, यासाठी मी श्री संत रविदास यांच्या चरणी प्रार्थना करतो. भैय्यासाहेब बिघाणे यांच्यासारखी मंडळी गेली अनेक वर्षे समाजाच्या परिवर्तनासाठी काम करीत आहेत, याचा मला आनंद आहे. समाजाचा विकास होण्यासाठी समाजात डॉक्टर, वकील, पत्रकार, इंजिनियर, अधिकारी तयार झाले पाहिजेत. त्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. गुणवंतांचा सत्काराचा सोहळा चांगले शिक्षण घेण्याची प्रेरणा नक्कीच देईल.’ यावेळी श्रृती तांडेकर, नेहल पिंपळकर, हिमांशू नवले, देवांश चंदनकर आणि जीवेश मानेकर या विद्यार्थ्यांचा ना. श्री. गडकरी यांनी प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार केला. तसेच भालेगावच्या सरपंच शालिनी चवरे तसेच भाजप पदाधिकारी श्री. अशोक विजयकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. 

ना. श्री. गडकरी यांच्याकडून प्रोत्साहन

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व समाजातील इतर तरुणांमध्येही शिक्षणाप्रति आस्था निर्माण व्हावी, यासाठी ना. श्री. गडकरी यांच्याकडून ३६५ विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात आले. दहावी-बारावीच्या परीक्षेत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना १५०० रुपये व ६५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना १००० रुपयांचा रोख पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...