सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथाद्वारे जनजागृती शुभारंभ

 


जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथाद्वारे जनजागृती शुभारंभ

  🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757

वर्धा, दि.24 : रेशीम उद्योगास प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती चित्ररथाद्वारे गावपातळीवर पोहोचविण्यासाठी महा-रेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. 

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वरिष्ठ तांत्रिक सहायक रजनी बन्सोड, क्षेत्र सहायक ज्ञानेश्वर भैरम, शुभम ताकोते, पॅनल तांत्रिक अधिकारी योगेश रोडे, मंगेश हांडे, रविंद्र नागपूरकर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी अविनाश वाट, सचिन वाघमारे, प्रांजल वाघमारे, अविनाश शंभरकर इत्यादी उपस्थित होते.

 रेशीम उद्योग हा खरोखरच आर्थिक लाभ मिळवून देणारा उद्योग असून पारंपारीक पिकाला एक उत्कृष्ठ जोडधंदा ठरत आहे. शास्त्रोक्त पध्दतीने रेशीम शेती केली तर मोठ्या प्रमाणावर फायद्याची ठरणार आहे. जिल्ह्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांनी ही फायद्याची शेती यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या रेशीम शेतीकडे वळण्यासाठी नाव नोंदणी करावी व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुभारंभाप्रसंगी केले.

 अभियानादरम्यान रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दि.20 नोव्हेंबर ते दि.20 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. पात्र शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवडी करीता 500 रुपये नोंदणी शुल्क भरुन आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग हा शेती आधारीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वत:च्या शेतीवर कामकाज करुन त्या शेतात केलेल्या कामकाजाची मजुरी शासनाकडुन मनरेगाच्या नियमानुसार तीन वर्षाकरीता दिली जाते. या मध्ये रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पादीत कोषापासुन होणारे उत्पन्न त्या लाभार्थ्यास दुहेरी लाभ मिळवून देईल.  

लाभार्थ्यांस तीन वर्षा करीता 682 मनुष्य दिवस तुती लागवड, जोपासना व किटक संगोपन करणे तसेच 213 मनुष्य दिवस किटक संगोपनगृह बांधकामाच्या कालावधी मध्ये मजुरी अदा केली जाते. रेशीम पिकासाठी लागणाऱ्या संगोपनगृहासाठी कुशल खर्चाकरीता 1 लाख 21 हजार रुपये व साहित्यासाठी 32 हजार रुपये दिले जाणार आहे. अधिकचा खर्च लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. जे लाभार्थी मनरेगा योजनेमध्ये बसत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र 2 योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, साहित्य, तुती रोप वाटिका, बाल किटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासुन धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलींग मशीन करीता सर्वसाधारण वर्गासाठी अनुदान देण्यात येते, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...