सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मेरी माटी मेरा देश सारख्या उपक्रमांमुळे युवा पिढींमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होईल - खा.रामदास तडस

 


मेरी माटी मेरा देश सारख्या उपक्रमांमुळे युवा पिढींमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होईल  - खा.रामदास तडस

मेरी माटी मेरा देश उपक्रमाचा समारोप

जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा समारंभ

अमृत कलश राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी रवाना

🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757

वर्धा, दि.29 : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक शुरविरांनी बलीदान दिले. त्यांच्या बलीदानाची आठवण आजच्या तरुणांमध्ये कायम स्मरणात राहण्यासोबतच युवा पिढीमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होण्यासाठी मेरी माटी मेरा देश हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन खा.रामदास तडस यांनी केले. 

जिल्हा क्रिडा संकुल येथील सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेरी माटी मेरा देश उपक्रमाच्या जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकरी अमोल भोसले, अभियानाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, नगर पालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त हर्षल गायकवाड, विभागप्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग वर्धा येथून फुंकले. त्यामुळे वर्धा जिल्हा स्वातंत्र्याच्या चळवळीचा केंद्रबिंदू होता. स्वातंत्र्य चळवळीत येथील लोकांनी बलीदान दिले. त्यांचे हे बलीदान पुढील पिढीच्या कायमस्वरुपी स्मरणात राहण्यासाठी देशातील 7 हजार 500 गावातील माती कलशामध्ये गोळा करुन दिल्ली येथे नेली जाणार आहे. या मातीतून स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ तयार करण्यात येणार असलेल्या अमृतवाटीकेद्वारे स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान पुढील पिढीस कायम स्मरणात राहील, असे श्री.तडस म्हणाले. 

स्वातंत्र्य चळवळीतील शहीदांचे बलीदान व्यर्थ जाऊ नये. देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे व शहीदांप्रती नागरिकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी. या संकल्पनेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये देशाच्याf स्वातंत्र्याप्रती आपुलकीची भावना जागृत होऊन आजचा युवक गतीमान होईल, असे आ.दादाराव केचे म्हणाले. 

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीत विरांना वंदन करण्यासाठी व आपल्या माती बद्दल प्रेम व देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्याठी मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्याहस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या विरमाता, विरपत्नींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्ञानदा फणसे यांनी केले तर संचालन ज्योती भगत यांनी केले. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व पंचायत समित्यांच्यावतीने जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. 

जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा

तत्पुर्वी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे अमृत कलश जिल्हा परिषदेत आणण्यात आले. सर्व कलशाची जिल्हा परिषद येथून तसेच सर्व नगर परिषद येथून आलेल्या कलशाची यात्रा जिल्हाधिकारी कार्यालय येथून काढण्यात आली. या कलश यात्रेमध्ये खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, सर्व तालुक्यांचे अधिकारी गटविकास अधिकारी उपस्थित होते. क्रीडा संकुल येथील मुख्य कार्यक्रमस्थळी सर्व कलश मान्यवरांना सुपूर्द करण्यात आले. सदर कलश सायंकाळी स्वयंसेवकांमार्फत मुबंई येथे होणाऱ्या कार्यक्रमासासाठी रवाना करण्यात आले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...