सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी वैशाली गजभिये-वाणे यांची नियुक्ती

 


जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी वैशाली गजभिये-वाणे यांची नियुक्ती

🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757

वर्धा, दि. 12 :अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी वैशाली रमेशराव गजभिये-वाणे यांची नियुक्ती करण्यात आली असून संजय हरिराम मसंद व अनील रामनारायन तोष्णीवाल यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

अध्यक्ष व सदस्यांनी आपल्या पदाचा दि.10 ऑक्टोबर रोजी पदभार स्विकारला असून आयोगाचे कामकाज नियमित होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी तथा अधिवक्ता यांनी प्रकरणे दाखल करावी, असे आवाहन प्रबंधक अमोल रामटेके यांनी केले आहे. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची स्वागत केले. यावेळी कार्यालय अधिक्षक श्री.पाटील, उच्चश्रेणी लघुलेखक श्री.बन्सोड, निम्नश्रेणी लघुलेखक श्री.कुंभारे, अभिलेखापाल श्रीमती लेंडे, कनिष्ठ लिपिक श्री. पांडे, श्री. उगले व श्री.थुल उपस्थित होते.

तसेच 20 ऑक्टोंबर रोजी सैनिक दरबारचे आयोजन

वर्धा जिल्ह्यातील सेवारत व माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या अवलंबितांच्या जिल्ह्यातील विविध विभागात प्रलंबित असलेल्या व वैयक्तिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी सैनिक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. या सैनिक दरबारमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थित तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवारत व माजी सैनिक तसेच अवलंबितांना काही समस्या व अडचणी असल्यास कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दि.20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सैनिक दरबारमध्ये सेवारत व माजी सैनिक तसेच अवलंबितांना अडचणी किंवा समस्या असल्यास दि.17 ऑक्टोंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागदपत्रासह दोन प्रति अर्ज सादर करुन टोकन प्राप्त करुन घ्यावे. तक्रारी वैयक्तिक स्वरुपाच्या असाव्यात. मागण्या करणारी प्रकरणे, मोघम स्वरुपाच्या तक्रारी तसेच न्यायप्रविष्ठ, न्यायालयात तसेच लोकशाही दिनात निकाली निघालेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही, असे जिल्हा सैनिक अधिकारी फ्ला. धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...