सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ओबीसींचे ७२ वसतीगृह व ज्ञानज्योती आधार योजना त्वरीत सुरू करा!

 


ओबीसींचे ७२ वसतीगृह व ज्ञानज्योती आधार योजना त्वरीत सुरू करा!

अन्यथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे मतदारसंघात ओबीसी आंदोलन करू!

महात्मा फुले समता परीषदेने ओबीसी मंत्री अतुल सावे यांना दिले निवेदन!

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झालीत, पण महाराष्ट्रातल्या सामान्य ओबीसी मुलामुलींना अजुनही शासकीय वसतीगृहाचा लाभ मिळाला नाही. म्हणुन राष्ट्रीय ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांनी, नागपुरच्या मागील हिवाळी अधिवेशनात २७ डिसेंबरला ओबीसींची शासकीय ७२ वसतीगृहे व्हावीत, तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळत नसेल, त्यांना एस सी व एसटी च्या धर्तीवरच वर्षाला ६० हजार रूपये देणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यावर त्याच अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी याला मान्यता देवुन, मागील वर्षातच ओबीसींची वसतीगृहे व २१हजार सहाशे विद्यार्थ्यांना स्वाधार योजना सुरू करण्याची घोषणा २९ डिसेंबर २०२२ ला केली. पण मागील वर्ष गेले, नविन शैक्षणिक वर्ष अर्धे झाले, तरी ना ओबीसींचे शासकीय वसतीगृह सुरू झाले, ना ज्ञानज्योती आधार योजना. त्यामुळे बाहेरगावी शिकणारे ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनी हे हतबल झाले, त्यामुळे नागपुरला महाज्योतीच्या कार्यालयात महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने, ओबीसी मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष श्री अतुल सावे यांना, ही वसतीगृहे व आधार योजना त्वरीत सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी १३ सप्टेंबरला अर्थ विभागाची मिटींग घेवुन, ओबीसी वसतीगृहाच्या संपुर्ण खर्चाला व आधार योजनेला अर्थविभागाची मान्यता दिली. त्या सभेला छगन भूजबळ तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे हे सुध्दा उपस्थित होते.

असे असतांना अजुनही मंत्रीमंडळासमोर हा विषय जात नाही, व शासन निर्णयही निघत नाही. याबाबत निवेदनात खंत व्यक्त करण्यात आली. महाज्योतीच्या वतीने, जेईई निट विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेशात व टॅब वाटपात कपात करून ती दहा हजारावरून केवळ चार हजार करण्यात आली. ती पुर्ववत दहा हजार करावी, अशी मागणी करण्यात आली. महाज्योतीच्या पुणे येथील एमपीएससी युपीएससी व इतर विद्यार्थ्यांना फक्त १० हजार महिना स्टायपेंड मिळते. ती कमी आहे,ती १५ हजार करावी,दिल्लीसाठी १८ हजार करावी, सारथीच्या तुलनेत महाज्योती फारच मागे आहे. दिड वर्षापासुन २९ कोटी रूपये देवुन,महाज्योतीच्या मुख्यालयासाठी घेतलेली जागा तशीच पडुन आहे. महाज्योतीचे स्वतंत्र कार्यालय, प्रशिक्षण केंद्र नागपुरात व्हावे, सर्व महसुली विभागात महाज्योतीची अद्यावत विभागीय कार्यालये व्हावीत, तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला महाज्योतीचे २०० मुलींचे प्रस्तावित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे निवासी स्पर्धा पुर्व प्रशिक्षण केंद्र, ज्यासाठी शासनाने २४ कोटी रूपयाचा शासन आदेश ७ मार्च २०२२ काढला, ते त्वरीत सुरू करावे,अशा मागण्या निवेदनातुन केलेल्या आहेत.जर या मागण्या पुर्ण झाल्या नाहीत, तर महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व ओबीसी मंत्री अतुल सावे, यांचे मतदारसंघात नागपुर आणि औरंगाबाद ला आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमुद केले आहे.

ओबीसी मंत्री अतुल सावे यांना निवेदन देतांना महात्मा फूले समता परीषद नागपूर चे जिल्हा संघटक मनोज गणोरकर, नागपूर जिल्हा महीला अध्यक्षा, विद्या बहेकार, सचिन मोहोड नागपूर जिल्हा महासचिव, जयश्री गाडगे नागपूर महानगर महीला उपाध्यक्षा,आरती पाचघरे नागपूर महानगर महीला महासचिव,योगेश ठाकरे नागपूर ग्रा.ता.अध्यक्ष अड.विवेक सावरकर, अर्चना भगत, विक्रम राऊत, दामोधरजी सुर्वे, सरोज देशमुख, अस्मिता हातमोडे, विजय मुळे व समता परीषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...