हिंगणघाट शहरातील शास्त्री वार्ड मध्ये वर्षावास समाप्ती निमीत्ताने धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न
हिंगणघाट शहरातील शास्त्री वार्ड मध्ये वर्षावास समाप्ती निमीत्ताने धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न
🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने शास्त्री वार्ड येथील श्रमण बुद्ध विहार, हिंगणघाट. येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आयु.अशोकराव भारशंकर यांचे अध्यक्षतेखाली २०२३ वर्षावास प्रबोधन मालिका सत्रातील २३ वे पुष्प वर्षावास समाप्ती निमित्ताने शनिवार दि.२८/१०/२०२३ ला आयु. संजय च. वानखेडे (बौद्धाचार्य/केंद्रीय शिक्षक)(भा. बौ.महासभा हिं. ता. महासचिव) यांनी "बौद्धांची विश्व विद्यापीठे (वर्षावास समाप्ती) अश्विन पौर्णिमा)"अश्विन पौर्णिमा" या विषयावर प्रबोधन करून यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित पाहुण्यांनी तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून बुद्धवंदने नंतर धम्म अभियान गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रस्ताविक हिं.शहर अध्यक्ष बौद्धाचार्य आयु. राजू जी फुललेले यांनी केले . संचालन श्रध्दा ताई तर आभार अजय भाऊ यांनी केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका व नगर शाखेचे संपूर्ण पदाधिकारी संजय वानखेडे ,अंबादासजी गायकवाड ,रिंगणे सर, अभिमन्यूजी धोटे ,बाळा भाले ,सेवक दास झांबरे, एन.टी.भीमटे सर ,रमेशजी बुरबुरे ,अनिल गायकवाड, निरंजन कांबळे, धर्मदास थूल , चंद्रमणी कांबळे, बुध्दम कांबळे , वासंती देवगडे, तसेच सदस्य आणि वार्डातील शेकडो महिला त्याचप्रकारे उपासक-उपासिका .ई.आवर्जून उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या शेवटी खीर दान करून या कार्यक्रमाचा समारोप झाला.