सीधे मुख्य सामग्री पर जाएं

*मिलिंद कीर्ती यांना मुंबई साहित्य संघाचा पुरस्कार घोषित*

 


*मिलिंद कीर्ती यांना मुंबई साहित्य संघाचा पुरस्कार घोषित*

स्लग - ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ या ग्रंथाची निवड

नागपूर : पत्रकार व वैचारिक लेखक मिलिंद कीर्ती यांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे २०२२-२३चा पुरस्कार जाहीर झाला आहे. संघाच्या साहित्य पुरस्कार निवड समितीने मिलिंद कीर्ती यांनी लिहिलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग (खंड पहिला) : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ (२०२२) या ग्रंथाची रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्काराचे वितरण २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणार आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाने यावर्षीच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये श्रीमती निलिमा भावे पुरस्कृत रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी संघाचे साहित्य शाखा कार्यवाह अशोक बेंडखळे, पद्माकर शिरवाडकर व प्रतिभा सराफ यांच्या निवड समितीने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ या ग्रंथाची लोकशाही पद्धतीने निवड केली आहे. या पुरस्कार स्वरूपात १० हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. पुरस्काराचे वितरण संस्थेच्या वर्धापनदिनी दुबई येथील ‘अल अदिल’ ग्रुपचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योगपती धनंजय दातार यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. याशिवाय मुंबई साहित्य संघाचा चंद्रागिरी पुरस्कार अनुराधा कुळकर्णी, नाट्य पुरस्कार प्रतिभा रत्नाकर मतकरी, चित्रकला पुरस्कार विजयराज बोधनकर व उद्योजकता पुरस्कार धनंजय दातार यांना जाहीर झाला आहे.

पत्रकार मिलिंद कीर्ती यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग’ हा ग्रंथ दोन खंडात लिहिला आहे. त्या ग्रंथाचा पहिला खंड ‘तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ यामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान,रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज यासह कृत्रिम जन्म ते कृत्रिम इच्छा मरणापर्यंत विकसित झालेल्या विविध तंत्रज्ञानाचा मानवी जीवनाला होणार्‍या लाभाचे व आर्थिक विकासाचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. या ग्रंथाचा दुसरा खंड ‘सहमतीची हुकूमशाही : अ‍ॅरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी’ याचे प्रकाशन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते नागपूर येथे नुकतेच करण्यात आले. आतापर्यंत मिलिंद कीर्ती यांचे ‘दहशतवाद : न्यूयॉर्क ते खैरलांजी’ (२००८, सुगावा प्रकाशन, पुणे), ‘नवयान : विषमताअंताचा लढा’ (२०१२, लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबई), ‘मोहरा महाराष्ट्राचा’ (२०२२, संपादित, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई) व ‘सहमतीची हुकूमशाही : अ‍ॅरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी’ (२०२३, लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबई) आदी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...